शासनाने मापात पाप करणाऱ्यावर एजन्सीवर कारवाई करावी
तहसीलदार यांना निवेदन
एरडोंल प्रतिनिधी-
प्रधानमंत्री शासकीय तांदूळ योजनेत शासनाचे मापात पाप,तांदूळ पुरवणाऱ्या एजन्सीने 50 किलो चे कट्टे शासनाकडून स्वस्त धान्य दुकान दारांना कट्ट्यामागे सरासरी 2/3 किलो कमी मिळाले,त्यामुळे कमी आलेल्या तांदुळा मूळे गोरगरीब जनतेवर अन्याय झाला आहे ,अनेक बिगर रेशन कार्ड धारक यापासून वंचित आहेत. असे बरेच गावामध्ये,तालुक्यात, जिल्ह्यात,आणि महाराष्ट्रात बरेच लाभार्थी वंचित आहेत तरी शासनाने या कडे लक्ष द्यावे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज लोकनियुक्त सरपंच दिनेश बापू आमले यांनी तहसीलदार एरंडोल यांना आज निवेदन दिले
