पोलीस प्रशासनाने पत्रकारांची बाजू समजून घ्यावी
प्रमोद पाटील चिलाणेकर
जिल्हाध्यक्ष
भारतीय पत्रकार संघ
जळगांव प्रतिनिधी
सध्या जगात कोरोना विषाणू मुळे मानव जातीवर फार मोठे संकट आले आहे त्यातच या विषाणूने भारतात देखील शिरकाव केला आहे भारताचे पंतप्रधान मा नरेंद्र मोदी व महाराष्टाचे मुख्यमंत्री मा उध्दवजी ठाकरे यांनी कलम १४४ लागू केला आहे सर्वत्र लॉक डाऊन झाले आहे त्यांचा निर्णय हा मनुष्यासाठी सकारात्मक आहे जनतेने काळजी घेणे गरजेचे आहे शिवाय पोलीस प्रशासन देखील आपली जबाबदारी निष्ठेन पार पाडतांना दिसत आहे म्हणून वृत्तपत्र मिडीया सोशल मिडिया चित्रकार पत्रकार आदि पोलीस प्रशासनाचे कौतुकच करत आहे कारण विनाकारण रस्त्यावर रिकामे फिरणाऱ्यांमुळे नियमाचा भंग होतो म्हणून पोलीस भूमिका योग्य आहे परंतू लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जाणारा पत्रकार यांची भूमिका जाणून घेणे महत्वाचे आहे त्यांचे काम देखील जनजागृती व शासनास मदतीचे कार्य असते म्हणून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याकडे लक्ष देणे गरजेचे आहे पत्रकारास अशा काळात बातमी संकलन करून जनते पर्यन्त प्रसारण करणे महत्वाचे असते म्हणून पोलीस प्रशासाने किंवा शासनाने पत्रकार सरंक्षणासाठी पास देणे उचित असू शकते पत्रकारांनी देखील नियमांचे पालन करून एकटेच व बातमी संकलन साठीच वेळ दयावा व पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे व यांवर तोडगा काढावा असे मत भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष तथा लोकमतचे पत्रकार प्रमोद पाटील चिलाणेकर यांनी सोशल मिडिया वृत्तसंकलनास मांडली
