Halloween party ideas 2015


अमळनेर प्रतिनिधी
सध्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात संचारबंदी लागू केल्यामुळे एकीकडे जीवनाश्यक वस्तूसाठी सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकीकडे शासनाच्या आदेशाचे नागरिक पालन करीत असताना जीवनावश्यक वस्तू व भाजीपाला यांची विक्री चढ्या भावाने करताना शहरातीील सध्याचे चित्र आहे. यावर शासनाने व प्रशासनाने अंकुश घालावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
काही दुकानदार अमळनेर तालुक्यातील जीवनावश्यक वस्तूंचे भाव व भाजीपाल्यांचे भाव चढया भावात देत असल्याचे अनेक नागरिकांनी यासंदर्भात बोलताना सांगितले.
सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया नंतर मी गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने कुणी दुकानदार विकत असेल यासंदर्भात माझ्या वैयक्तिक व्हाट्सअप नंबरवर तक्रार करावी मी अश्या दुकानदारावर फौजदारी गुन्हा दाखल करेल असे गटविकास अधिकारी संदीप वायाळ यांनी सांगितले.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.