Halloween party ideas 2015


*अ भा.महात्मा फुले समता परिषद आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा---

प्रवीण बी.महाजन*

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद प्रस्तुत राज्यस्तरीय निबंध स्पर्धा चे आयोजन समता परिषदेचे कार्यध्यक्ष बापू भुजबळ यांच्या तर्फे करण्यात आले असून निबंध पाठवण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२० आहे हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच महाराष्ट्र्र चे संस्थापक अध्यक्ष प्रविण बी.महाजन यांनी केले आहे.
सदर निबंध स्पर्धा ची शब्द मर्यादा एक हजार ते बाराशे शब्दांची असून निबंध लिहण्याची वयाची कोणतेही अट नाही निबंधाचा विषय एक दिवा ज्ञानाचा आणि एक दिवा संविधानाचा असे दोन विषयांवर निबंध लिहायचा आहे विजेत्यांना प्रथम पारितोषिक रोख रक्कम ११००१ द्वितीय ७००१ तृतीय पारितोषिक ५००१ रोख रक्कम आहे स्पर्धेतील निवडक निबंध पुस्तक रूपाने प्रकाशिक केले जातील निबंध PDF स्वरूपात पाठवायचे आहेत.निबंध समता परिषद इमेल न. samtaparishad.nsk@gmail.com ला पाठवावे किंवा समाधान जेजुरकर डॉ. नागेश गवळी,अभिजित भुजबळ,हर्षल खैरनार यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन क्रांतिसूर्य महात्मा फुले विचारमंच चे महाराष्ट्र्र संस्थापक प्रवीण बी.महाजन यांनी केले आहे.

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.