भाजपला उशीरा सुचलेले शहाणपण तरी माळी समाजावर अन्यायच
मा अतुलजी सावे यांची मंत्रीपदी
निवडीबाबत अभिनंदन।।।
लोकसभा निवडणुकी नंतर च्या मंत्रीमंडळ विस्तारात माळी समाजातील मराठवाडा येथील आमदार मा अतुलजी सावे यांची मंत्रीपदी निवड करून माळी समाज खुश करण्याचा हा प्रयत्न
देशात माळी समाज मोठया संख्येने आहे महाराष्ट मध्ये समाज मोठा आहे हे चंद्रपूर च्या अहिर यांचा पराभवाने दाखवून दिलेले आहे यापुढे पुन्हा असे होऊ नये असेच माळी समाजास वाटते
इतर समाजास दोन दोन कबीनेट मंत्रीपदे आणि जो समाज मोठ्या संख्येने आहे त्यास एक राज्यमंत्री पद देऊन माळी समाजाचे समाधान नाही अशी माळी समाजात जोरदार चर्चा आहे आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत माळी समाजाला 16 टक्के जागा मिळाव्यात म्हणून विविध संघटना एकत्र येऊन विशेष प्रयत्न करणार आहेत त्यादृष्टीने माळी समाजाने पुनः उत्तम संघटन ठेवले पाहिजे अन्यथा अन्याय सहन करावा लागेल आता माळी समाजा तील युवक वर्ग जागा झाला असून युवा नेतृत्व उत्तम काम करत आहे