Halloween party ideas 2015

'अमोल कोल्हेंकडे मुंबई राष्ट्रवादीचं नेतृत्व द्या'


लोकसभा निवडणुकीत 'जायंट किलर' ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूरचे नवनिर्वाचित खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचं राजकीय वजन प्रचंड वाढलं आहे. फर्डे वक्ते आणि तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या कोल्हे यांच्याकडं मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपवावी, अशी मागणी पुढं आली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या एका गटानं थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाच तसं साकडं घातलं आहे. 


आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक गुरुवारी पार पडली. पक्षाच्या मुंबईतील स्थितीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. यावेळी अमोल कोल्हे यांना मुंबईची जबाबदारी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडं केली. सध्या मुंबईची धुरा माजी मंत्री सचिन अहिर यांच्याकडं आहे. 




छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक व्यक्तिरेखांमुळं अमोल कोल्हे महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचले आहेत. तरुणाईमध्ये ते प्रचंड लोकप्रिय आहेत. कोल्हे हे उत्तम संघटक आहेत. एखादी भूमिका जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं कसब त्यांच्याकडं आहे. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिग्गज उमेदवार शिवाजीराव-आढळराव पाटील यांना टक्कर देताना त्यांनी हे सिद्ध केलंय. त्यांच्या या कौशल्याचा मुंबईत पक्षाला मोठा फायदा होईल, असं राष्ट्रवादीच्या युवा पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.




पक्षाचे एक युवा पदाधिकारी नितीन देशमुख यानं याबाबत माहिती दिली. तो म्हणाला, 'तरुणांकडं पक्षातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवायला हव्यात, असं खुद्द पवारसाहेबांचं मत आहे. कोल्हे हे तरुण आहेत. ते मुंबईचे रहिवासी असल्यानं त्यांना शहराच्या समस्यांचीही जाण आहे. त्यामुळंच त्यांना मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्षपद द्यावं किंवा त्यांना निरीक्षक म्हणून नेमावं, अशी मागणी आम्ही केलीय.'

WhatsApp वर क्लिक करा बातमी मिळवा

लोकप्रिय बातम्या

महत्वाच्या घडामोडी

Powered by Blogger.